संघर्षातून उदयास आलेली पालवीची शाळा ,पालवी प्रकल्प हा 2001 मध्ये सुरू झाला. त्यामध्ये एच.आय.व्ही बालके असल्यामुळे बाहेरील शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे पालवीने 2007 मध्ये पालवीची शाळा सुरू केली. परंतु शाळेतील शिक्षकांना त्यांच्या मनायोग्य मानधन न मिळाल्यामुळे काही शिक्षक शाळा सोडत होते .काही 2 - 3 वर्षे राहून परत जायचे. असेच काही दिवस गेले. आणि कोविड-19 मध्ये सर्व शाळा बंद पडल्या. बाहेरून जे शिक्षक येत होते ते यायचे बंद झाले. आणि आता शाळेचा प्रश्न उभा राहिला. मुलांना शिकवण्यासाठी कोणी नव्हते तेव्हा आमची 12th झालेली शिक्षक नव्हते. मग मुल दिवसभर अशीच बसून असायची. काही उन्हात फिरत राहायची. तेव्हा आम्ही दहावी बारावी झालेल्या मुलींनी शाळा सुरू ठेवली. व आज 2 ते 3 वर्ष झाली आम्ही पालवीमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करत आहोत.
- Miss. Sunita S Kharat
No comments:
Post a Comment